(आपल्या सर्वांमध्ये असलेल्या सामान्य माणसास.......)
सर्वत्र तू साक्षीदार असतो
तरीही दडतो बिळातच
बाहेर येण्यासाठी तुझ्या
बिळात पाणी शिरावे लागते
नेहमीच काठावर राहून
वाहत्या धारेला घाबरणारा
प्रवाहात उतरण्यासाठी तुला
कोणीतरी ढकलावे लागते
तुझ्या "स्व' जागृतीसाठी
हवी असते संकटांची मालिका
अखेर, तू बिळाबाहेर येतो
रोरावणाऱ्या प्रवाहात उतरतो
तेव्हा वादळे नतमस्तक होतात
पर्वतही आपला मार्ग बदलतात
नाका-तोंडाशी येत नाही तोपर्यंत
तू गांधीजींचा माकडच राहतो
मित्रा, काळ बदलतोय, बघ
हात काढ डोळयावरचे, तोंडावरचे
जाग येण्याआधीच पाणी
नाकाच्याही वर गेले तर?
Saturday, July 21, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment